NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली, आर्यन खान केसमधून डच्चू?

तपास आता वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्याकडे

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून या केसचा तपास काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंवर 8 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. वानखेडे यांची बदली झाल्याने या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे मोठ्या वादात सापडले होते. विशेष म्हणजे आर्यन खान खटल्यातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सैल याने देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळं या केस संदर्भात त्यांनी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समीर वानखेडे यांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतून बाजूला केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडेला हटवण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. एकूण २६ प्रकरणे आहेत ज्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. ही फक्त सुरुवात आहे… ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही करू. असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.