मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी राजस्थानच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा

सचिन पायलट काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष

मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी, काँग्रेसशासित राजस्थानमधील सर्व मंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान राजीनामा दिला.

प्रदेश काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा, ज्यांनी इतर दोन मंत्र्यांसह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा कळवला. त्यांनी बैठकीच्या सुरुवातीला या संदर्भात प्रस्ताव ठेवला होता, त्यानंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला.

दोतसरा, हरीश चौधरी आणि रघु शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या बैठकीत सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी पत्रकारांना सांगितले.

“आम्हाला रविवारी दुपारी 2 वाजता प्रदेश काँग्रेस कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले आहे जेथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, AICC सरचिटणीस अजय माकन आणि PCC प्रमुख गोविंद सिंग दोतसरा पुढील सूचना देतील,” असे खाचरियावास म्हणाले.

फेरबदल करण्याचे काम मुख्यमंत्री आणि पक्षाच्या उच्चाधिकाऱ्यांचे असून ते काय सूचना देतात हे उद्या कळेल, असे खाचरियावास म्हणाले.

“आम्ही उद्या दुपारी २ वाजता प्रदेश कार्यालयात पोहोचणार आहोत. आम्ही तेथे दिलेल्या पुढील सूचनांचे पालन करू,” असं ते यावेळी म्हणाले.

रविवारी राजभवनात शपथविधी होणार असल्याचे सूत्रांची माहिती

शुक्रवारी जयपूर येथे आलेले राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन हेही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.

मंत्र्यांनी राजीनामा देण्यापूर्वी अशोक गेहलोत मंत्रिमंडळाचे संख्याबळ २१ होते.

राजस्थान, जिथे आमदारांची संख्या 200 आहे, तिथे मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 30 मंत्री असू शकतात.

मुख्यमंत्री गेहलोत यांचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थकांना सामावून घेण्याच्या मागणीसह गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा चालली होती. पायलट यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केले होते.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांव्यतिरिक्त, सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आणि बसपामधून काँग्रेसमध्ये गेलेल्यांनाही या फेरबदलाकडून अपेक्षा आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.