त्या 700 शेतकरी कुटुंबीयांची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी- खा.संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या कायद्यांचे महत्व शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत, असं सांगत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावे व नवीन सुरुवात करावी, असं आवाहनही मोदींनी केले. शेतकरी आंदोलन काळात ज्या 700 शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

‘आंदोलन काळात ज्या 700 शेतकऱ्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. त्यांच्या कुटुबांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी. तसंच लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत. जय जवान, जय किसान,’ असं ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.