खा. अमोल कोल्हेंना दीड लाखांचे मताधिक्य देण्यात अतुल देशमुख यांचा सिंहाचा वाटा : देवदत्त निकम

कळंब, ता. २ :

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा श्रावणी बैलपोळा भरतो. यावेळी शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या सोहळ्यास जत्रेचे स्वरूप आले होते.


यावेळी तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. खेड, जुन्नर, शिरूर, आंबेगाव तालुक्यातील विविध पक्षातील राजकीय नेते मंडळींनी सहभागी होत ग्रामस्थांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ख. अमोल कोल्हे यांनीही मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत आनंद व्यक्त केला.

खा. अमोल कोल्हे यांच्यासोबत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख हे देखील उपस्थित होते. कळंब ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. खा. अमोल कोल्हे यांना दीड लाखाचे मताधिक्य देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी केला. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून अतुल देशमुख हे प्रबळ दावेदार असून, पक्षाने त्यांना संधी दिल्यास नक्कीच चुरशीची लढत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.