मुंबईत पुन्हा होणार ग्लोबल कॉन्फरन्स, जागतिक दर्जाचे तज्ञ होणार सहभागी!
प्रतिनिधी,
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, पर्यावरण संवर्धन, आर्थिक साक्षरता या क्षेत्रांत जयहिंद लोकचळवळ कार्यरत आहे. जनतेला आपल्या अधिकारांची जाणीव व्हावी या उद्देशाने जयहिंद लोकचळवळ ही सेवाभावी संस्था काम करते.
यावर्षी पुन्हा जयहिंद लोकचळवळच्या माध्यमातून ३० सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हे तीन दिवस मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ग्लोबल कॉन्फरन्स होणार आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या परिषदेची धुरा आ. सत्यजीत तांबे पार पाडत आहेत. विविध क्षेत्रातील जागतिक दर्जाचे तज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.