माझ्या जिवाला धोका’, उर्फीने केली मुंबई पोलिसांकडे मागणी!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चेत असेलला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. राजकारणातील अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया देत हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी हा वाद वाढतच चाललाय.

 

एवढंच नव्हे तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा याप्रकरणावरून तोफ डागली. मात्र उर्फी प्रकरणावर कारवाई करण्याइतका वेळ महिला आयोगाला नसल्याची भूमिका अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली.

 

त्यानंतर उर्फीला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा जर उर्फी समोर आली तर तिचं थोबाड फोडेन असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला. त्यावरुन माझ्या जिवाला चित्रा वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका असल्याची तक्रार उर्फीनं पोलिस स्टेश्नमध्ये केली होती.

 

त्यावरुन आता उर्फीच्या सुरक्षेबद्दल चित्र बदलताना दिसत आहे. महिला आयोगाकडून उर्फीच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे पत्र देऊन मागणी केली आहे. उर्फीला सुरक्षा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली.

 

उर्फी जावेदच्या फॅशनस्टाईल आणि कपडे परिधान करण्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांना तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर यावरून अनेक वाद विवाद झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.