सत्यजीत तांबेंचं अनुकरण केलं तर हुंडाबळी होणारच नाही !
सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करून प्रस्थापित केला आदर्श !
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या लग्नात मुलीच्या वडिलांनी केलेल्या लग्नाचा थाट, मुलीच्या सासरच्यांवर केलेला पैशांचा व भेटवस्तूंचा वर्षाव, त्यानंतरही नवरदेवाकडच्या लोकांची वाढलेली पैशांची हाव या सर्व गोष्टी वैष्णवी चे आयुष्य संपवण्यासाठी कारणीभूत ठरल्या. त्यानंतर विविध समाजांच्या वतीने बैठका घेऊन लग्न सोहळ्यांबाबत आचारसंहिता तयार करण्यात आली, यात हुंडा प्रथेला आळा घालणे, साध्या पद्धतीने लग्न करणे अशा गोष्टींचा ठराव मंजूर करून घेण्यात आला.
मात्र, समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आ. सत्यजीत तांबे. आजोबा स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी, मामा मंत्री, वडील माजी आमदार असं असूनही सत्यजीत तांबेंनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी त्यांचे या निर्णयाचे महत्त्व फार लोकांना पटले नसेल, पण वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर सत्यजीत तांबे यांनी घेतलेला निर्णय किती दूरदृष्टीचा होता याची प्रचिती येते.
Be the change you want to see in the world !
“आपल्याला समाजात जो बदल घडवायचा आहे त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे” या महात्मा गांधीजींच्या वचनावर नितांत विश्वास असलेले कार्यकर्ते म्हणजे आ. सत्यजीत तांबे. म्हणूनच स्वतःचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने, कोणताही बडेजाव न करता सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.