सावधान!! ट्रोलिंगच्या जमान्यात सोशल मीडियावर नव्हे तर महाराष्ट्रात एक लोकचळवळ उभी राहत आहे!
पण या चळवळी जेव्हा उभ्या राहिल्या, तेव्हा युवा भरकटलेला नव्हता, तेव्हा विखारी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता. आजच्या काळात मात्र अशी चळवळ उभी राहणं कठीण आहे, असं अनेक जुनी जाणती लोकं सांगतात! पण म्हणतात ना कोणतीही संघटना किंवा चळवळ ही त्यातील 1000 कार्यकर्त्यांच्या जीवावरच तळागाळात पसरते. पण ती टिकते ती नेतृत्व गुण आणि अजेंड्यावर! जयहिंद लोकचळवळचा अजेंडा हा सर्वसमावेशक आहे, सुदृढ समाज निर्मितीचा आहे आणि विशेष म्हणजे त्याची धुरा सांभाळत आहेत युवा नेते सत्यजीत तांबे! सत्यजीत तांबे स्वतः उच्चशिक्षित आहेत, धोरणी आहेत, अभ्यासू आहेत! पण यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे डॉ. सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच संवेदनशीलता व समाजासाठी आपण काहीतरी देणं लागत असल्याची जाणीवही आहे. ही जाणीव असल्यानेच ते जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यास उत्सुक आहेत. जयहिंदच्या पहिल्याच बैठकीस युवकांचा जो उदंड प्रतिसाद मिळाला, यावरून एक लक्षात येतं की आताची युवा पिढी भरकटली नसून ती चांगल्या लोकांच्या, चांगल्या ध्येयाच्या शोधात आहे. युवकांच्या या उमद्या प्रतिसादाने माझ्या मनातील त्याबद्दलचा गैरसमज दूर केलाय! मला विश्वास आहे, जयहिंद लोकचळवळ अल्पावधीतच महाराष्ट्राच्या गावागावात पोहचेल व सदृढ समाजनिर्मितीसाठी एक शाश्वत मॉडेल उभं करेल! सर्वात महत्वाचं म्हणजे ही सुरुवात आणि याच्या विस्ताराची धुरा सांभाळणारं नेतृत्व, दोन्हीही दमदार असल्याने पुढच्या 10 वर्षांत महाराष्ट्राच्या समाजकारण व राजकारणावर सुध्दा एक विधायक आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याचे काम ही लोकचळवळ नक्की करेल!
– त्रयस्थ पत्रकार