तीन कृषी कायदे केंद्र सरकारकडून रद्द ; युवक काँग्रेसची आंदोलनांची मोहिम यशस्वी
काळे कृषी कायदे मागे...
गुरुनानक यांच्या प्रकाशपर्वाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवर सपशेल माघार घेत हे आगामी संसद अधिवेशनात कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा केली आहे. युवक काँग्रेसने देशभरात केलेल्या आंदोलनांच हे यश म्हणता येईल.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्त्वात राज्यभरात युवक काँग्रेसने सह्यांची मोहीम राबवली होती. मुंबईत तांबेंच्या नेतृत्त्वात कँडल मार्च देखील आयोजित करण्यात आला होता. युवक काँग्रेसने दिल्लीला केलेल्या संसद घेराव आंदोलनाची सुद्धा देशभरात चर्चा झाली होती. यात महाराष्ट्रातील युवक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात् नागपूर येथे संसद घेराव आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्या आंदोलनांमुळे वर्षभराच्या काळापासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनांना हवा मिळाली होती.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलक दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ठाण मांडून बसले होते. या आंदोलनात वेगवेगळ्या घटनांत आतापर्यंत जवळपास ७५० शेतकऱ्यांनी जीव गमावल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. हे कायदे रद्द करण्याच कारण आगामी काळातील निवडणुका असल्याची चर्चा रंगली आहे.