भारताने रविवारी मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 17 धावांनी विजय मिळवला आणि या मालिकेत 3-0 ने वेस्ट इंडिज संघाला क्लीन स्वीप दिला. या विजयामुळे भारताला T20 संघ क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. 269 गुण मिळवत भारताने T20 क्रमवारीत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
रँकिंग क्रमवारीत (269 गुण) 39 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांचे रेटिंग समान असताना, भारताचे एकूण 10,484 गुण आहेत, तर इंग्लंडच्या खात्यात 10,474 गुण आहेत. त्यांनंतर पाकिस्तान (266 रेटिंग), न्यूझीलंड (255) आणि दक्षिण आफ्रिका (253) हे देश पहिल्या पाच देशांच्या यादीत आहेत, तर ऑस्ट्रेलिया (249) श्रीलंकेवर 4-1 अशा मालिका विजयानंतर सहाव्या स्थानावर आहेत.