समीर वानखेडेंना जबर दणका! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला सदगुरु रेस्ट्रो बारचा परवाना!

नवी मुंबईतील वाशी येथील समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या सद्गुरू रेस्ट्रो बारचे लायसन्स ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन्स ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. या बार वरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली होती. आता या बारचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे समीर वानखेडेंच्या जन्मतारखेच्या घोळामुळे त्यांच्या वयामध्ये विसंगती असल्याचे कारण देत हे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

यासंदर्भात समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले होते. भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून म्हणजे २००६ पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे आहेत. तसेच या उद्योगामधून मिळणाऱ्या कमाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.