नरखेड येथील फळ रोपवाटिकेला राज्य शासनाने दिली मंजुरी!
सलील देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश...
नागपूर,
नरखेड येथील तालुका बिज गुणन केंद्राची जवळपास ५० एकर जागा ही गेल्या अनेक वर्षापासुन पडीत होती. यामुळे या जागेवर अद्यावत फळरोपवाटीका व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या फळरोपवाटीकेला मंजुरी मिळाली असून लवकरच येथे अदयावत पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.
नरखेड तालुक्यातील नवेगाव शिवारात कृषी विभागाच्या माध्यमातुन तालुका बिज गुणन केंद्राची निर्मीती करण्यात आली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात जागेचा कोणताही वापर होत नसल्याने केंद्रासाठी संपादीत करण्यात आलेली ५० एकर जागा ही पडीत होती. या भागात शेतकऱ्यांच्या हिताचे नविन काही तरी प्रकल्प उभे राहावे यासाठी या भागाचे आमदार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले. या बिज गुणन केंद्राच्या जागी अदयावत अशी फळरोपवाटीका व्हावी अशी त्यांची ईच्छा होती. याकरीता त्यांनी कृषी विभागाला तसा अहवाल तयार करण्याचे आदेश सुध्दा दिले होते. त्याप्रमाणे कृषी आयुक्त कार्यालय नागपूर यांनी तसा अहवाल तयार करुन तो राज्य सरकारला सादर केला अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली.
या अहवालाच्या माध्यमातुन ही फळरोपवाटीका मंजुर होण्याच्या दुष्टीकोणातुन सलील देशमुख यांनी सातत्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासह या विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या. शेवटी नरखेडच्या या फळरोपवाटीकेला मंजुरी मिळाली असुन तसा शासन आदेश सुध्दा सोमवारी काढण्यात आला आहे. या फळरोपवाटीकेच्या माध्यमातुन नागपूर जिल्हातील नरखेड व काटोलसह कळमेश्वर व सावनेर, अमरावती जिल्हातील वरुड व मोशी, वर्धा जिल्हातील कारंजा व आर्वी तर मध्यप्रदेशातील पांढुर्णा, या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची संत्रा व मोसंबीचे रोपे उपलब्ध होणार असल्याची माहीती सलील देशमुख यांनी दिली.
सदर फळरोपवाटीकेत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत फळबाग लागवड व महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेंअंतर्गत कलमे व रोपांची निर्मीती करण्यात येणार आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर आता येथे भौतीक सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने संरक्षण भिंत, सिंचनाची व्यवस्था व सोबत पॉलीहाऊसची निर्मीती करण्यात येणार आहे. या सुविधा निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रोप निर्मीतीला सुरुवात होणार आहे. या फळरोपवाटीकेतुन संत्रा व मोसंबी उत्पादकांना चांगल्या दर्जाचे रोपे मिळावे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्यात येणारच आहे. याही पुढे जावुन शेतकऱ्यांना सातत्याने मागर्दशन होण्याची दुष्टीकोणातुन येथे प्रयत्न करण्यात येणारअसल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन नरखेड येथे फळरोपवाटीकेला मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले यांचे सलील देशमुख यांच्यासह नागपूर,वर्धा, अमरावती जिल्हातील संत्रा व मोसंबी उत्पदकांनी आभार मानले आहे.