खरंच शुभांगी पाटील झाल्या होत्या का नॉट रीचेबल?

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात एकच गोंधळ उडाला. या मागचं कारण म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शुभांगी पाटील यांचा नंबर नॉट रिचेबल लागला आणि त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं.

 

दरम्यान यानंतर, शुभांगी पाटील या समोर आल्या आणि मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पुढे म्हणाल्या की, ‘मी कुठेही गेले नव्हते. मला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा आहे.

 

माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, मी अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. पेन्शन योजना असेल किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल यासाठी मी निवडणुकीला उभी राहणार आहे. आणि ते मला पाठिंबा देणार आहेत असा, मला विश्वास आहे असं वक्तव्य शुभांगी यांनी केलं.

 

सत्यजित तांबे यांच्या बद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या की मला काहीही माहिती नाही काॅंग्रेस तांबे यांच्याबद्दल काय निर्णय घेईल. मला महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास आहे ते मला पाठींबा देणार.

 

मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे मला कोणत्याही नेत्याने किंवा पक्षाने संपर्क केला नाही. गिरीश महाजन यांनी संपर्क केला की नाही, त्यावर मी बोललेलं बरं नाही, असंही पाटील म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.