Mansi Naik ने सांगितले घटस्फोटामागील खरं कारण, या गोष्टींचा वापर करुन वाचवा तुमचे लग्न
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री Manasi Naik सतत चर्चेत येत असते. तिने काही महिन्यांपूर्वीच पती Pardeep Kharera या पासून विभक्त होणार असल्याचे सांगितले. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आता मानसी नाईक हिने तिच्या लग्न घटस्फोटामागील खरं कारण सर्वांसमोर सांगितले आहे. ती नक्की कोणत्या कारणाने ह्या निर्णयापर्यांत पोहचली याचे मुख्य कारण तिने सांगितले आहे. मानसीचच्या घटस्फोटाचे कारण वाचून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराला. कोणतंही नातं तोडणं खूपच सोप असतं पण एखादे नाते जपण हे खूपच कठीण असते. मानसीच्या लव्हस्टोरीमधून आपण देखील बऱ्याच गोष्टी शिकू शकतो.
अभिनेता मानसी नाईक एका मुलाखत घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत सांगितले की मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. तर एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मानसीला तुझा लग्नावरचा विश्वास उडालाय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, माझा लग्नावरचा विश्वास अजिबात उडालेला नाही. कारण लग्न हे फारच खास असते.
मानसीने सांगितले की आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. आता मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष द्यायाचे आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने तिच्या नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. आज तिच्या हिंदीतील नवीन बेव फिल्मचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सर्ववरुन मानसीने तिच्या करिअरवर फोकस केले आहे हे दिसून येते.