‘परमसत्य’…? अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाला सांगितले.

मुंबई | अँटिलिया स्फोटके प्रकरण (Antilia Bomb Scare) आणि व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणासंदर्भात ‘परमसत्य’ अखेर समोर आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतीत ‘परमसत्य’ सांगायचे आहे अशी विनंती चांदीवाल आयोगाला केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) महाराष्ट्र सरकारची दिशाभूल करत होते, असं देशमुख (Maharashta Former Home Minister Anil Deshmukh) यांनी चांदीवाल आयोगाला सांगितले. देशमुख यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगाला हि माहिती सादर केली त्यामध्ये हे ‘परमसत्य’ असल्याचं म्हटलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. 25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलियाजवळ सापडलेली हि स्कॉर्पिओ हिरेन यांची होती. त्यात जिलेटिनच्या कांड्या होत्या. त्यानंतर ठाणे येथील कार डीलर मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्रा खाडीत सापडला होता. याप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती.

अनिल देशमुखांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी आयोगाकडे मागणी केली, महाराष्ट्र एटीएसने तयार केलेली कागदपत्रे त्यांना हवी आहेत. त्यांनी जी काही कागदपत्रे गोळा केली होती. ती मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोर सादर केली आहेत. त्यामध्ये संपूर्ण सत्य आहे, असं कुलकर्णी म्हणाले. तसेच देशमुखांना विचारणा केली असता, ”मी गृहमंत्री असताना एटीएसने गोळा केलेल्या कागदपत्रांमध्ये परमबीर सिंग हे महाराष्ट्र राज्य सरकारची दिशाभूल करत असल्याचे पुरावे आहेत. ते कधीतरी रेकॉर्डवर आणायला पाहिजे”, असं देशमुख म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.