अजितदादांचं मोठं वक्तव्य म्हणाले वंचितला सोबत घेण्याबाबत…

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची एकत्र युती करण्यासंदर्भात चर्चा सुरु होती.

 

मात्र प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्याविरोधात टिका केली होती. आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना यावर एक नविन फॉर्म्यूला सुचवलाय.

 

 

अजितदादा म्हणाले की, जर काही लोकांना आमच्यासोबत यायचं असेल तर आमच्याकडे येतात, आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा येत असतात. तसेच काही लोक हे त्या त्या पक्षाच्या कोट्यातून निर्णय घेत असतात. जर काॅंग्रेसला काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा.

 

जर शिवसेनेला जो कोटा दिला असेल तर त्यांनी त्यांच्या कोट्यातून निर्णय घेऊन आपल्या मित्र पक्षाला सामावून घ्यावं. तसेच राष्ट्रवादीने सुद्धा आपल्या मित्र पक्षाला आपल्या कोट्यातून सामावून घ्यावं, यामुळे येत्या काळात अडचणी निर्माण होणार नाहीत, असंही यावेळी अजित पवार म्हणालेत.

 

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची बैठक सुद्धा पार पडली होती. त्यानंतर राजकारणात चर्चेला उधाण आलं. शिवसेना आणि वंचित एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत असल्या तरी प्रकाश आंबेडकरांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.