आता लक्ष्य ऑलिम्पकचे – अभिजीत कटके

महाराष्ट्र केसरीचेही मैदान जिंकल्यावर हिंद केसरीचेही मैदान मारणाऱ्या पुण्याच्या अभिजीत कटके याने आता आपले लक्ष्य ऑलिम्पिकवर असल्याचे म्हटलयं. हैद्राबाद येथील मैदान जिंकून हिंद केसरी किताबाचा मान मिळविला. यानंतर वेळात वेळ काढून अभिजितने शुक्रवारी पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला उपस्थिती लावली. त्या वेळी अभिजीतशी संवाद साधला असता त्याने कुस्ती आणि महाराष्ट्राची प्रगती याबाबत आपली मते मोकळेपणाने व्यक्त केली.

कारकीर्द घडत असताना वजन कायम राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय प्रयत्न करतोस ?                                               कुस्ती हा एक खेळ वजन गटात होत असल्यामुळे वजन राखणे हे सर्वांत आव्हान असते. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम करण्याकडे माझा कटाक्ष असतो. रोज सकाळ, संध्याकाळ तीन तास सराव करतो. सध्या जगमल यांच्याकडे मी मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रात सरावाची सुविधा सध्या तरी उपलब्ध आहे. सरावाला चांगले जोडीदार मिळत असल्याने मला कुस्तीचाही चांगला सराव मिळत आहे.

महाराष्ट्रातील कुस्तीबद्दल काय म्हणशील ?                           महाराष्ट्रातील कुस्ती सध्या निश्चित प्रगती करत आहे. कुमार आणि खुल्या पातळीवर महाराष्ट्राचे मल्ल आपले नाव ठसढशीत पणे उमटवत आहे. मॅटवरील कुस्ती आता अधिक लोकप्रिय होत आहे. या बदलाशी महाराष्ट्रातील मल्लांनी चांगले जुळवून घेतले आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रातील मल्ल मोठ्या व्यासपीठावर यशस्वी होताना दिसून येतात. या मल्लांनी डोळ्यासमोर मोठे उद्दिष्ट ठेवले, तर त्यांना यशापर्यंत जाण्याचा मार्ग सापडू शकतो. या प्रवासात कठोर मेहनत घेणे मात्र आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.