कर्नाटकात सरकार स्थापनेचे सूत्र जवळपास निश्चित, कोण होणार मुख्यमंत्री?

कुरुबा समाजातील सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. त्यांच्या हाताखाली तीन उपमुख्यमंत्री असू शकतात. तिघेही वेगवेगळ्या समाजातील असतील. यामध्ये वोक्कलिगा समाजातील डीके शिवकुमार, लिंगायत समाजातील एमबी पाटील आणि नायक/वाल्मिकी समाजातील सतीश जारकीहोळी यांचा समावेश आहे.
कर्नाटकातील कुरुबांची लोकसंख्या ७%, लिंगायत १६%, वोक्कलिगा ११%, अनुसूचित जाती/जमाती सुमारे २७%, म्हणजे काँग्रेसला ६१% लोकसंख्येला या निर्णयाबाबत आत्मविश्वासात घ्यायचे आहे.
त्याचबरोबर, काँग्रेस संघटनेशी संबंधित लोकांनी डीके शिवकुमार यांना त्यांच्या संघटनात्मक कौशल्यांच्या आणि अनुभवाच्या जोरावर, त्याचबरोबर त्यांचे वयही जास्त आहे, त्यामुळे डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे. असे ही काही नेत्यांचे मत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार,
आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. जनमत डीके शिवकुमार यांच्या बाजूने आहे मात्र बहुतांश आमदारांचा पाठिंबा सिद्धरामय्या यांना असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत डीके शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्षपदी ठेवण्याचा विचार काँग्रेस हायकमांड करत आहे. जेणेकरून त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुका सांभाळल्या त्याच पद्धतीने लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळू शकेल असा विश्वास आहे. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे. हायकमांडने सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासह या दोन्ही गटातील काही आमदारांना दिल्लीला बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हायकमांडचे संपूर्ण नियोजन आहे. सध्या कर्नाटकातील 28 लोकसभा जागांपैकी केवळ एका जागेवर काँग्रेसचे खासदार डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश आहेत. बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 28 पैकी किमान 20 जागा पक्षाच्या खात्यात याव्यात अशी काँग्रेसची इच्छा आहे. व्होट बँक डोळ्यासमोर ठेऊन ते करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आता सरकार विविध समुदायांसाठी काम करत आहे. एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सिद्धरामय्या यांना तीन वर्षांसाठी आणि डीके शिवकुमार यांना शेवटची दोन वर्षे मुख्यमंत्री केले जाऊ शकते.

एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सिद्धरामय्या यांना तीन वर्षांसाठी आणि डीके शिवकुमार यांना शेवटची दोन वर्षे मुख्यमंत्री केले जाऊ शकते. सिद्धरामय्या कुरुबा समाजातून आलेले आहेत आणि मागासलेल्या जातींमध्ये त्यांचे मजबूत अनुयायी आहेत. याचा फायदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत घ्यायचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.