सजग वेब टीम
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधी यांनी कलम १४४ चं उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नजरकैदेत असलेल्या प्रियांका गांधींवर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी काँग्रेसकडून योगी सरकारचा निषेध केला जातोय.
प्रियांका गांधी यांना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर केली जाण्याचीही शक्यता आहे. पोलिसांनी हवं तर मला अटक करावी, पण मी शेतकरी कुटुंबीयांना भेटल्याशिवाय परतणार नाही, अशी ठाम भूमिका प्रियांका गांधी यांनी घेतली आहे. याशिवाय आज प्रियांका यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट करत पंतप्रधान मोदींना घडलेल्या घटनेबाबत जाब विचारला आहे.