मा. आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून नातेपुते शहरात आधुनिक स्ट्रीट लाइटचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त २.६५ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन संपन्न

नातेपुते, १३ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते शहराला एक विशेष सौगात मिळाली आहे. पुणे-पंढरपूर महामार्गावरील नातेपुते शहरासाठी अत्याधुनिक स्ट्रीटलाइट योजनेचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. ही योजना माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आली असून, शहराच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे.
राज्य शासनाच्या विशेष निधीतून झाली अंमलबजावणी
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून २ कोटी ६५ लाख रुपयांची विशेष निधी मंजूर करण्यात आली होती. माजी आमदार राम सातपुते यांनी या संदर्भात म्हटले की, “माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावाला किमान एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नातेपुते शहरासाठी रस्ते, गटार, सभामंडप आणि मंदिर जीर्णोद्धारासाठी एकूण २७ कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील ही स्ट्रीटलाइट योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर झाली.”
“या योजनेचे काम राजकीय कारणांमुळे उशीरा झाले, परंतु आज डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त याचे उद्घाटन होत आहे हे आनंदाचे असल्याचे मत सातपुते यांनी मांडले त्यांनी शासनाच्या सहकार्यावर आभार व्यक्त केले आणि शहराच्या पुढील विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

स्थानिक नेते आणि प्रशासनाची सहभागी भूमिका:
या कार्यक्रमात माजी आमदार राम सातपुते, शरद मोरे, राजूशेठ पांढरे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, मुख्याधिकारी डॉ. कल्याण हुलगे, शिवसेनेचे सतीश सपकाळ, नगरसेवक भानुदास राऊत, दीपक काळे, शशिकांत बरडकर, ज्ञानेश्वर उराडे, अमित चांगण, हनुमंत ढालपे, हणमंतराव सुळ, देविदास चांगण, राहुल पद्मन, प्रविण काळे, शशि कल्याणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी ही योजना शहराच्या सौंदर्य आणि सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण भर घालणारी आहे अभिप्राय दिला.

या आधुनिक स्ट्रीट लाइट योजनेमुळे नातेपुते शहराच्या प्रमुख रस्त्यांवर रात्रीच्या वेळी उजेड वाढेल, ज्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल आणि शहराचे नागरी सौंदर्यही वाढेल. ही योजना केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगतच नाही, तर शहरवासियांच्या दैनंदिन गरजांनाही पूर्ण करणारी आहे. स्थानिक नागरिकांनी या योजनेचे स्वागत केले आहे आणि शहराच्या पुढील विकासासाठी अशाच प्रकारच्या योजना राबविण्याची मागणी केली आहे.

अशाप्रकारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नातेपुते शहराला मिळालेली ही भेट शहराच्या प्रगतीच्या दिशेने एक सुवर्णक्षण ठरावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.