जयहिंद लोकचळवळीच्या विस्तारासाठी सत्यजीत तांबेंचा विदर्भ दौरा !

सुदृढ समाज निर्मितीचे ध्येय घेऊन काम करणारी जयहिंद लोकचळवळ संपूर्ण राजभर कार्यरत झालेली आहे. या चळवळीचे संघटक नाशिक पदवीधार मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे आहेत. जयहिंद लोकचळवळीच्या विस्ताराची सुरुवात वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांपासून झाली असून राज्यभरातील युवकांचे संघटन व्हावे, यासाठी सत्यजीत तांबे यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे.

युवकांच्या संघटनातून सशक्त समाज निर्मितीचे ध्येय साकार करण्यासाठी आ. सत्यजीत तांबे प्रयत्न करत आहेत. वर्धा आणि चंद्रपूर दौऱ्याच्या निमित्ताने आ. सत्यजीत तांबे यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. २ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे सुरु झालेले जयहिंद लोकचळवळीचे कामकाज वाढविण्याच्या दृष्टीने विदर्भाचा दौरा करत आहे. महात्मा गांधीजींचे आशीर्वाद घेण्यासाठी सेवाग्राम येथे भेट दिली असून जयहिंदची आढावा बैठक घेण्यात आली, असे आ. सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले.

यासह त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या असून जयहिंद लोकचळवळीचे कार्यकर्त्ये तसेच पदाधिकारी यांच्या देखील भेटी घेतल्या. वर्ध्यातील फिनिक्स अकादमीला भेट दिली. या अकादमीचे प्रा. नितेश कराळे यांची देखील त्यांनी भेट घेतली व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. आयुष्यात करिअरच्या दृष्टीकोनातून ध्येय असणे आवश्यक आहे, असे आ. सत्यजीत तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.